लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.
भाईकाकाज लेटर टू मीरा ...Bhaikakas letter to Meera Pu La deshpande letters pu la deshpande books
चाळीसएक वर्षांपूर्वी पु.ल. देशपांडे मुंबईत वरळीला राहात होते. त्याच परिसरात असलेल्या आदर्शनगर वसाहतीत वेगवेगळी मातृभाषा असणारी मुलं तिथल्या मैदानावर खेळताना आपापसात ज्या `इंग्लिश' (खरं तर त्या भाषेला `मिंग्लिश'च म्हणावं लागेल!) भाषेत बोलत, त्याच भाषेत पु.ल. देशपांडे यांनी त्याच कॉलनीत राहणारी श्रीमती सुनीताबाई यांची भाची मीरा ठाकूर- आत्ताची डॉ. मीरा नगरकर- हिला ती शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पाठविलेलं हे पत्र! प्रथमच घेतलेल्या टाइपरायटरवर `बिब्लिकल मेथड' नं- म्हणजे `सर्च ऍंड दाऊ शॅल फाईंड- शोधा म्हणजे सापडेल' अशा पध्द्तीनं अक्षरपट्टीवरील मूळाक्षरं शोधत शोधत स्वत:च एका बोटानं टाईप केलेलं हे पत्र... पु.ल. देशपांडे यांच्या आजवरच्या प्रकाशित वाड:मयात नसलेलं!
मराठी बोध वाक्ये (Marathi Bodh Vakye) Marathi Mhani
1. कुणीही कस दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
2. पाण्यात राहायचे तर माशांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला मासा बनावे लागते.
3. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
2. पाण्यात राहायचे तर माशांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला मासा बनावे लागते.
3. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
पु.लं. चे काही किस्से Pu La, Pu La Deshpande, P L Deshpande , Pu La Kisse
१)
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
२)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
२)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .
शान्ता शेळके आणि पुलं! - किस्से आणि कोट्या ( Pu La Deshpande, P L Deshpande Kisse, Pu La Kisse )
'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''
'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''
फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...
बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .
'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''
फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...
बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .
पुलं, टिळक आणि चिवडा - किस्से आणि कोट्या ( Pu La Deshpande , Pu La Deshpande Kisse aani kotya , Pu la aani Tilak )
' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....''
हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता .
कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !
हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता .
कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !
जगवले खाद्यजीवनाने - किस्से आणि कोट्या Pu La Deshpande Kadyajeevan Kadyajivan Pu La Deshpande kisse and kotya
हिंदी-चिनी युद्धाच्या वेळी आघाडीवरला एक मराठी सैनिक कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होता. त्यांच्या अंगावर पुरेसे लोकरी कपडे नव्हते. म्हणून बरोबर आणलेले काही दिवाळी अंक तो धगीसाठी जाळू लागला. जाळण्याआधी चाळता चाळता त्याला एका अंकात ‘ पु. ल. देशपांडे ’ हे नाव दिसले. लेखाचे नाव दिसले. लेखाचे नाव- ‘ माझे खाद्यजीवन ’! तो अंक आगीत टाकण्याआधी त्याने वाचायला घेतला. थंडीत एकूणच जिवाला तो वैतागला होता. पण पुलंचा हा लेख वाचल्यावर ‘ छे ! छे ! हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे ’ असा त्याने आपल्या मनाशी निर्धार केला. तुमच्या लेखामुळे मला जगावेसे वाटले असे त्याने पुलंना कळवले तेव्हासुद्धा पुलंची तीच गत झाली.
पुलंचा हजरजबाबी विनोद - किस्से आणि कोट्या ( Pu La Deshpande, Vinod Pu la deshpande kathakathan
पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले.
पुलंकित Pulankit
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित 'शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रियझाला.
'सबकुछ पुलं'ला आमंत्रणच नाही - किस्से आणि कोट्या
पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे ' गुळाचा गणपती '!त्यात सर्व काही पुलंचे होते.कथा , पटकथा , संवाद ,गीते , संगीत आणि दिग्दर्शन , एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला!
कोल्हापुरी साज - किस्से आणि कोट्या
कोल्हापूरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मैत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सांगत होती , ' काय सुंदर सुंदर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात. अप्रतिम नमुने आणि सुंदर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळयात की दुसरं काहीच घालायला नको. ' हे ऐकत जवळपास असलेले भाई मिश्किलपणे हळूच म्हणाले , ' खरंसांगतेस की काय ?'क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर मैत्रिणीची लाजून व आमची हसून मुरकुंडी वळली.
गाऊन दाखवा - किस्से आणि कोट्या
अलीकडेच मुंबईत पडलेल्या प्रलयंकारी पावसाच्या दिवशी एन. सी. पी. ए मधून ' वराती 'ची तालिम आटोपून मी व माझी मैत्रिण मीना फडके ,कमरेएवढया साचलेल्या पाण्यातून चिंब भिजून माझ्याघरी पोहाचलो. मीनाला त्या रात्री माझा गाऊन घालून माझ्याचकडे रात्र घालवावी लागली. ही गोष्ट मी सगळयांना ऐकवली होती. भाईंच्याही ती कानावर गेली. त्यावर ते म्हणाले , ' तरीच परवा यशवंत देवांना कुणीतरी म्हणाले , की गाऊन दाखवा. ' तर नीला म्हणाली ,' बरोबर आणला नाही. '
ऊस Oos कोल्हापुरी शेक्सपीअर- किस्से आणि कोट्या
कोल्हापूर आणि तेथीलएकूणच भाषाव्यवहारम्हणजे पु . लं . च्यामर्मबंधातील ठेव .कोल्हापुरी समाजाइतकाचकोल्हापुरी भाषेचा बाजसांगतांना ते म्हणाले , ' इथेरंकाळयाला रक्काळाम्हणतात पण नगा - याचानंगारा करतात .कोल्हापुरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरीबाहेर येऊन आपल्याछातीवर हात बडवायला लावील असं आहे . ' त्यानं शेतात ऊंसलावला ' याचं इंग्रजी रुपांतर इथल्या मुन्सफानं एकदा 'he applied US in his farm' असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुद्धलेखनाच्यानियमाप्रमाणं ' यू ' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता .
आज और कल - किस्से आणि कोट्या
पुलंच्या ‘ सुंदर मी होणार ’या नाटकावर आधारित असलेला ‘ आज और कल ’हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ‘हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ‘ आज और कल !’
Subscribe to:
Comments (Atom)




